संपूर्ण आरोग्याची गुरुकिल्ली – निसर्गाशी नातं

2 11 |

“संपूर्ण आरोग्याची गुरुकिल्ली – निसर्गाशी नातं”
“यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, यथा ब्रह्मांडे तथा पिंडे।
मम देहे स्थितं विश्वं, तस्मात् देहोऽहमाश्रयः॥”

जसं या विश्वात पंचमहाभूतांची रचना आहे, तशीच रचना आपल्यातही आहे. शरीर हे विश्वाचं प्रतिबिंब आहे. म्हणूनच, शरीर आणि निसर्ग यांचं नातं हे दैवी आहे — तुटत नाही, बदलत नाही. आपली मानसिक ताकद आणि कमकुवतपणा दोन्ही काळच आपल्याला दाखवतो. अशा वेळी निसर्गाशी संपर्क साधल्याने आपल्याला एक सार्वत्रिक ऊर्जेची अनुभूती होते, जी आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रासांपासून मुक्त करते. आपले शरीर पंचमहाभूत—आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी—यांच्यापासून बनलेले आहे. मृत्यूनंतर हे शरीर पुन्हा निसर्गात विलीन होते, कारण आपण निसर्गातूनच निर्माण झालो आहोत. त्यामुळे निसर्गाशी आपले नाते अखंड आणि अपरिहार्य आहे. इतर प्राणी हजारो वर्षांपासून त्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीचे पालन करत आहेत. मात्र आपण माणसे, प्रगतीच्या नावे अस्वास्थ्यकर, प्रक्रियायुक्त, आणि निसर्गविरोधी अन्न खात आहोत. यामुळे शरीरातील संतुलन बिघडते आणि विविध आजार जन्माला येतात. आपल्याला पुन्हा निसर्गाकडे वळण्याची गरज आहे. याचा अर्थ असा नाही की आपण जंगलात जाऊन रहावे, तर याचा अर्थ असा आहे की आपण आपली जीवनशैली अधिक नैसर्गिक, संतुलित आणि सेंद्रिय बनवावी. ज्या अन्नातून आपले जीवन टिकते, त्याचा आदर करणं देखील निसर्गाची पूजा करण्यासारखंच आहे.

जेव्हा आपण निसर्गाशी जोडण्याचा निर्णय घेतो, तेव्हा आपलं जीवन अधिक सोपं आणि शांत होतं. कारण आपण जन्माला येताना शुद्ध मन आणि शरीर घेऊन येतो. पण जसजसे आपण मोठे होतो, तसतसं बाहेरचं खाणं, भेसळयुक्त अन्न आणि चुकीच्या सवयीमुळे ही शुद्धता कमी होत जाते. अशा अन्नामुळे आपली पचनक्रिया बिघडते आणि शरीर आजारी पडू लागतं. आपलं मनही अशांत होतं. यामागचं मुख्य कारण म्हणजे आपण निसर्गापासून दूर गेलो आहोत. निसर्ग म्हणजे सात्विकता – शुद्ध, साधं आणि संतुलित जीवन. जर आपण सात्विक जीवनशैली पाळली – म्हणजेच शुद्ध आणि नैसर्गिक अन्न खाल्लं, साधा दिनक्रम ठेवला – तर आपण निसर्गाशी पुन्हा जोडले जाऊ शकतो.

जर आपण कष्टकरी कामगार वर्गाचा विचार केला, तर लक्षात येतं की ते बहुतांश वेळा बाहेरचं, कृत्रिम अन्न खात नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांना हे परवडणं शक्य करत नाही. पण हेच लोक नैसर्गिक जीवनशैलीशी जोडलेले असतात, त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते आणि ते शारीरिक व मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर राहतात. ते “नो-ऑप्शन” म्हणजेच पर्याय नसलेली जीवनशैली जगतात — परंतु हाच जीवनशैलीचा भाग त्यांच्या आरोग्यास पोषक ठरतो. उलट, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्गाकडे निवड करण्याचे अनेक पर्याय असतात, परंतु याच पर्यायांमुळे – जसं की प्रोसेस्ड अन्न, फास्ट फूड, तणावपूर्ण जीवनशैली – शरीरावर आणि मनावर ताण येतो, आणि आरोग्य बिघडतं. साधं जीवन जगणाऱ्या लोकांची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांना शरीर आणि मनाला विश्रांती द्यायचं महत्त्व माहीत असतं. कारण बहुतांश आजारांची सुरुवात आपल्या मनापासून होते. पारंपरिक भारतीय जीवनशास्त्र हे केवळ शरीरापुरतं मर्यादित नाही, तर ते मन आणि आत्म्याचंही विज्ञान आहे. त्यामुळे आजच्या काळात आपलं मन निरोगी ठेवण्यासाठी या तत्त्वज्ञानाकडे वळण्याची गरज आहे. निसर्गाशी जोडलेलं, शुद्ध विचारांचं आणि साध्या जीवनाचं महत्त्व आपण सर्वांनी नव्याने समजून घेण्याची हीच वेळ आहे.

आपल्या आयुष्याचे खरे आरोग्य फक्त शरीराच्या देखभालीत नाही, तर मनाच्या समतोलात लपलेले आहे. मनाचे पाच स्तर असतात – मानस (सामान्य विचार करणारे मन), बुद्धी (निर्णय घेणारी शक्ती), चित्त (पूर्वीचे अनुभव आणि आठवणी), पुरुष (स्वतःची जाणीव), आणि ईश्वर (सर्वोच्च चेतना). जेव्हा अहंकार आपल्यावर ताबा घेतो, तेव्हा मन अस्थिर होतं आणि दुःखी जीवन आणखी दुःख आणि वेदना निर्माण करतं. यामुळे अनेक मानसिक व शारीरिक आजार उद्भवतात. त्यामुळे मनाचं शुद्धीकरण हेच खऱ्या आरोग्याचं मूल आहे.

आपलं शरीर दोन मूलभूत कार्य करतं – अन्नाचे पचन आणि शरीराची स्वच्छता (म्हणजे विषारी पदार्थ बाहेर टाकणं). या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी मनाचं आणि जीवनशैलीचं संतुलन आवश्यक आहे. या संतुलनासाठी आपल्या जीवनात काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचं आहे. आणि हे बदल सहज होणार नाहीत – त्यासाठी नियमित सराव आवश्यक आहे: निसर्गाच्या जवळ राहण्याचा सराव करणे आवश्यक आहे म्हणजे शुद्ध हवेत श्वास घेणे, सेंद्रिय अन्न खाणे, आणि नैसर्गिक जीवनशैली अंगीकारणे. दूसरा म्हणजे ध्यानाचा सराव – ज्यामुळे मन शांत राहतं, विचार स्पष्ट होतात आणि अंतर्मनातील उर्जा जागृत होते. तिसरा म्हणजे कृतज्ञतेचा सराव – आपल्याला जे काही मिळालं आहे त्याबद्दल मनापासून आभार मानणे, ज्यामुळे मनात सकारात्मकता निर्माण होते.

दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने झाली, तर संपूर्ण दिवस सकारात्मक उर्जेने भरतो. रोज सकाळी स्वतःच्या आयुष्यातील १० महत्त्वाच्या व्यक्ती आणि १० गोष्टी यांचे स्मरण करून त्यांना धन्यवाद द्या – हे एक सोप्पं पण अत्यंत शक्तिशाली कृतज्ञता व्यायाम आहे. आठवड्यातून एकदा वेळ काढा – एक पेपर घ्या आणि त्यावर मनात साठून राहिलेला राग, मत्सर, आणि पश्चाताप लिहा. मग स्वतःलाही आणि इतरांनाही
मनापासून क्षमा करा. ही क्षमाशीलता आणि कृतज्ञता ही आपल्या मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे. तसेच आजकाल बहुतांश लोक – मग ते पांढर्‍या कॉलरमध्ये काम करणारे असोत, गृहिणी असोत, किंवा इतर व्यावसायिक – हे सर्वजण एका ठराविक चौकटीत, बसून काम करणाऱ्या जीवनशैलीत अडकलेले आहेत. या जीवनशैलीने निसर्गाशी असलेली आपली नाळ सैल होत जाते.

निसर्गाशी जोडण्यासाठी काही साधे उपायही असू शकतात: जसे की, दररोज ४५ मिनिटे ते १ तास चालणं, किंवा तुम्हाला आवडणारा कोणताही व्यायाम – जो तुम्ही कुठेही, कधीही करू शकता. पोहणं आणि वेगाने चालणं यांसारखे व्यायाम शरीराला निसर्गाशी पुन्हा जोडतात.शरीर आणि आत्मा यांचं नातं घट्ट असलं तरी, जोपर्यंत अहंकार टिकून आहे, तोपर्यंत निसर्गाशी खरी जोड होणार नाही. आत्म्याला आध्यात्मिकरित्या विकसित होण्यासाठी शरीर आणि मन – दोन्ही शुद्ध असणं गरजेचं आहे. शरीर हा विद्यार्थी आहे, आणि मन हे त्याचा गुरु आहे. निसर्ग म्हणजेच ईश्वर. जेव्हा शरीर, मन आणि निसर्ग यांचं एकत्व होतं, तेव्हाच देवत्व प्रकट होतं. आज आपण सिझेरियन सेक्शन, IVF, केमोथेरपी, स्टेंट, स्किन ट्रीटमेंटसारख्या कृत्रिम प्रक्रियांमध्ये अडकतो आहोत. या सगळ्या गोष्टी शरीराला निसर्गाच्या विरुद्ध नेतात. आपण त्यांना पूर्णपणे नाकारू शकत नाही, पण त्यांना पर्याय म्हणून सात्विक जीवनशैली स्वीकारणं हे अधिक शाश्वत आणि आरोग्यदायी ठरू शकतं. निसर्गाशी जोडलेली जीवनशैली ही केवळ आरोग्याची नव्हे, तर आत्मिक उन्नतीची वाट आहे.

पण आज आपण विज्ञानाच्या नावाखाली निसर्गाला बदलण्याचा, नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला वाटतं की आपण निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहोत – हाच अहंकार निसर्गाचा आणि शेवटी मानवतेचाही विनाश घडवू शकतो. निसर्गाचे स्वतःचे नियम आहेत – संचय आणि निर्मूलन. जे निर्माण होतं, त्याचं एक दिवस निर्मूलन होणारच. ही चक्रं निसर्ग चालवत असतो – शिस्तबद्ध आणि निष्पक्षपणे. विज्ञानाचं खरे स्वरूप म्हणजे समजून घेणं – निसर्ग कसा काम करतो हे जाणून घेणं. पण आज आपण विज्ञानाचा वापर निसर्गाच्या विरोधात करत आहोत. रासायनिक अन्न, कृत्रिम उपचार, आणि अनावश्यक तांत्रिक हस्तक्षेप हे सगळं आपल्याला निसर्गापासून अधिकाधिक दूर नेत आहे. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे – निसर्ग हा देवासारखाचआहे. निसर्गात जे शुद्ध, नैसर्गिक आणि सात्विक आहे, तेच ईश्वररूप आहे.जेव्हा आपलं शरीर निसर्गाशी जोडलं जातं, तेव्हाच ते खऱ्या अर्थाने “ईश्वराशी” जोडले जातं. कारण निसर्गात ईश्वराचं अस्तित्व आहे – त्याच्या सृष्टीमध्ये, त्याच्या श्वासात आणि त्याच्या शांतीत.

“जेव्हा आपण मन, शरीर आणि आत्मा यांचं तुटलेलं नातं पुन्हा जोडण्याचा विचार करतो, तेव्हा त्यात दुवा म्हणून निसर्ग पुढे येतो. तो आपल्याला न फसवता, न ओढता, अत्यंत शांतपणे आणि स्वीकाराने पुन्हा आपल्याकडे बोलावतो – अगदी आईसारखा.”

आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|👉🏼 https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/

नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!

DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या  

अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा.  9511218891